Posts

Showing posts from August, 2024

माफ करा महाराज!!!

 माफ करा महाराज!!! खरं सांगतो महाराज, लय वाईट वाटलं "कोसळण्याची"बातमी झाली डोळा अश्रूंनी गाठलं रयतेचं राज्य तुम्ही,दिमाखात थाटलं पण मा़झं माझं करुन बारा बलुत्यात वाटलं महाराष्ट्र म्हणे याला,जणू पुरोगामी लेकरं जो तो झाला मालक इथे नाही कुणालाच धाक रं भावांनी बहिणीला इथं,पंधराशे वाटलं लेकीबाळी 'सावज'तिथं नराधमांनी गाठलं अशा नराधमां तुम्ही,न्याय म्हणून छाटलं हाच कायदा पाहिजे असं मनापासून वाटलं प्रगतीच्या मागे धावून,आम्ही "कर्तव्याला" टाकलं कोसळल्याची बातमी झाली राजं काळीजंच फाटलं . . स्वाभिमानी राज्य करता,तुम्ही नाही कधी हरले "राजे' फक्त आमचे म्हणत मावळे नालायक ठरले मावळे नालायक ठरले @सुविकोळेकर

मुकद्दर

 अवरंगजेब : छत्रपतींच्या व स्वराज्याच्या आयुष्यातील 'अ' च्या बाराखडीतील पहिला 'अ' आदिलशाहीचा मग अफजलखानाचा मग. . अ अ आग्रा भेटीचा नंतर 'अ' 'अ 'अवरंगजेबाचा की जो शेवटी अ अ अहमदनगरमधे शांत झाला. अत्यंत महत्वाकांक्षी , धोरणी, निष्णात योध्दा ,राजकारणधुरंदर, नाचगाणं व वैषयिकतेपासून दूर यासोबतच धूर्त ,बेरकी, मतलबी ,स्वार्थी , खुनशी , शंकेखोर,धर्मांध व अहंकारी, असे व्यक्तिमत्त्व अर्थात इतिहासकार त्याचे महत्व नाकारत नाहीत.बालपणीच आजा जहांगीरच्या कैदेत राहाव लागलेला अवरंग व दारा यांना नकळत राजकारणातील सुंदोपसुंदी तिथूनच कळू लागली. नंतरच्या गादीवारस संग्रामात बापाला कैद , भावांची हत्या,मुलांना ,पुतण्याना,सरदारांना कैद कधी खून अरेरे !!. . कमी वयातच कर्तबगारी करुनही मोठ्या भावाला दाराशुकोहला बादशाहीपासून रोखण्यासाठी टोकाचे हिंस्र राजकारण. पुढे दख्खनच्या स्वारीत स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजांवर अनन्वित अत्याचार करुन त्यांची जीवनयात्रा संपवल्याचा आनंद फार काळ टिकला नाहीच. . .पाचपाच लक्ष माणसं तितकीच जनावरे घेऊन दक्खनेत उतरलेल्या बादशाही लवाजम...

शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध भाग १९

 शेतकर्‍यांची पोरं उत्तरार्ध १९ बिंदू बर्‍याच दिवसांनी कॉलेजला आली होती. नितीन व शंतनु दोघेही तिला भेटतात. शंतनु तिला बघताच विचारतो "अरेच्चा दर्शन दुर्मिळ झालंय तुमचं" म्हणत हात जोडतो. बिंदू उगाचंच कसनुसं गालात हसते. दूरवरुन रेणू येताना दिसताच नितीन म्हणतो" हो ना काही लोकं नगो नगो म्हणलं तरी तोंड‍ाम्होरं दिसत्यात" शंतनु मागे वळतो व येणाऱ्या रेणूकडे बघून डोळे मिचकावत हसतो.बिंदू त्या दोघांना हटकते " काय रे तुम्ही " रेणू यांना सामील होताच नितीनकडे बघत शंतनुला विचारते." काय बोल्ला रे हा " शंतनु नकारार्थी मान हलवत म्हणतो काही नाही गं असंच " नाम लिया ओ शैतान हाजिर " रेणू त्याच्याकडे बघत म्हणते " सुधरणार नाही हा गावठी" नितीन " असूदेत रेणूताई लय नगो शेंडा हाणूस हिथं तर राहताय मास्तर कॉलनीत अन् टेंभा करताय मंबईचा." "मास्तर नाही शिक्षक कॉलनी म्हण." रेणू म्हणते "तेच ते 'गावठी' नाही गावाकडचे म्हणावं" नितीन म्हणतो "गपा रे" बिंदू बोलते. "असो बोला बाईसाहेब कुठे अद्रृश्य झ...