एक तोचि मल्हार . . !
एक तोचि मल्हार ! ! छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या पुढच्या पिढीचे ध्वजवाहक आणि पेशवाईत तावून सुलाखुन निघालेले निडर व निबर व्यक्तिमत्त्व म्हणजे मल्हारराव होळकर.बाळाजी विश्वनाथ नंतर थोरले बाजीराव तदनंतर पेशवे नानासाहेब व नंतर माधवराव पेशवे अशा चारही पेशव्यांच्या कारकिर्दीत मैदान गाजवलेला भीष्मच जणू!! पहिल्या बाजीरावांचा सार्थ साथीदार. राघोभरारीत उत्तरविजयानंतर अशा स्वारीमुळे उत्पन्न मिळावयाचे राहून जवळपास पाऊणकोट कर्ज झाले.अर्थात दफ्तरी सांभाळणारे भाऊसाहेबांनी यावर " मग " अशा स्वार्या काय कामाच्या " म्हणून आक्षेप घेतला व यावर "मोठ्या स्वार्या जिंकायच्या म्हटल्या की जास्तीची फौज लागते, इथूनपुढे मुलुखगिरी तुम्हीच करत जा" दफ्तरी आम्ही बघू " म्हणत रघुनाथराव पेशव्यांनी नाराजी व्यक्त केली. इथे भाऊसाहेबांनी घरबंधू राघोबांची ही अवस्था केली तर इतर सरदारांची खैरच केली जाणार नाही अस मत पडलं. मात्र जेव्हा मल्हारबाबांची ,श्रीमंतांशी व भाऊसाहेबांची भेट होते तेव्हांचा गंभीर प्रसंग असा की मल्हार राव विचारतात " भाऊसाहेब तुम्हांस शपथ आहे एकंदर दौलतीवर कर्ज क...