गारेगार
गारेगार . . . साधारण १९८९ ते १९९२ चा काळ असावा. आताच्या काळासारखी संपन्नता होती अशी नाही किंवा नव्हतीही. त्यातच आमचा पहिली ते चौथीचा कालावधी असावा. बालवाडीचा वर्ग जोतिबाच्या देवळात (कुलकर्णी बाई) इतर वर्ग मारुतिच्या देवळात व नंतर काही दिवसांत "जीवन शिक्षण विद्यामंदीर "मराठी शाळेत. तशीही शिकायला कमी पण रानामाळात राबनार्या कष्टकऱ्यांना दिवसभर मुलं "पार्क" करायचे हक्काच ठिकाण. डब्यात भाकरीभाजी देऊन आयामाऊली रान जवळ करायच्या.डब्यात बहुधा अंडयाची पोळी (ऑम्लेट) असेल तर देवळातल्या वर्गात मांसाहारी( नॉनव्हेज) वाले (आयसोेलेट) केले जायचे. आम्ही कायम व्हरांड्यात आयसोलेशन मधे असायचो. साधारण दुसरीच्या वर्गात असू दुपारच्या सुट्टीत हुंदडायला (बोंबलत)शाळेबाहेर यायचो.बाजारपेठेच्या तळावर येऊन इनमिन तिन पानपट्यात डोकावायचो.आंबे विकनार्या एका आज्जींपाशी जाऊन उगाच आंब्याची लाल पिवळा बुलांग अशी स्तुती करायचो.लक्ष चुकवून आंबा उचलून पळायचो.अन् दुसर्या दिवशीही निरागस निर्लज्जपणे पुन्हा तिच्यापाशी पुन्हा जाऊन बसायचो. कहर म्हणजे आजी स्वता:हून एकेक आंबा हातावर टेकवायची." पोरानू...