शेतकर्यांची पोरं : उत्तरार्ध भाग पंधरा
शेतकर्यांची पोरं : उत्तरार्ध भाग पंधरा आई नको नको म्हणत असताना दुचाकीगाडी घेऊन शंतनु व नितीन कॉलेजला जातात.बाबा बाहेरगावी असल्याकारणाने विचारणारं कुणी नव्हतं. अर्थात आईला " आजचा दिवस फक्त असंही बाबा देतच नाहीत गाडी"असं शंतनु विनवून पटवतो.आईला लेकाचं ऐकावंच लागतं. शंतनुला स्वत: गाडी चालवत तालुक्यास जाणं मौजेचे वाटायचं पण त्याच्या बाबांना ती चैन वाटाय़ची. नितीनही सोबत असल्याने त्यात जास्तच भर पडली. नितीनला तशी उगाचंच शायनिंग वाटायची पण मित्राला कसं नाही म्हणायचं.म्हणून तोही आनंद घेत होता. गाडीवरुन कॉलेजमधे आत शिरताना मुलामुलींनी यांच्याकडं पाहणं या दोघांनाही अप्रूप वाटायचं. तोच समोरुन रेणू दवे व बिंदू आल्याचं बघताच यांच्या चैतन्यात भरंच पडली जणू यापेक्षा आनंद तो काय.!! "अय्या ते बघ दोघे"असा रेणूचा आवाज येताच त्यांनी गाडी थांबवली. गप्पा मारल्या.थोडीशी ऐट मारली , गाडी वाहनतळावर लावली. शंतनु तर्जनीमधे चावी फिरवत होता .दोघेही आपापल्या क्लासरुमकडे निघाले. बिंदूची व नितीनची नजरानजर झाली.खरंतर तिला देखील गाडीची चैन पटली नव्हती.तिने नापसंती दर्शवली . आज बस पकडायची नव्...